एकूणच अर्थसंकल्पापासून पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहिला आहे, उद्धव ठाकरे यांच्य...
एकूणच अर्थसंकल्पापासून पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. कर्जमाफीपासून शेतकरी वंचित राहिला आहे, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वीज बिलातील घोळ मिटवा, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
जुन्याच योजना पुन्हा नव्याने मांडल्या आहेत. भाजप सरकारच्या कार्यकाळातील चालू कामांच्या घोषणा ठाकरे सरकारने केल्या आहेत. कोरोनात अडचणीत आलेल्या समाजाला कोणताही आधार दिला नाही, असे फडणवीस म्हणाले.
पेट्रोल डिझेलच्याबाबतीतही कोणतीही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने भाववाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली आहे.
जुन्याच योजना पुन्हा नव्याने मांडल्या आहेत. भाजप सरकारच्या कार्यकाळातील चालू कामांच्या घोषणा ठाकरे सरकारने केल्या आहेत. कोरोनात अडचणीत आलेल्या समाजाला कोणताही आधार दिला नाही, असे फडणवीस म्हणाले.
पेट्रोल डिझेलच्याबाबतीतही कोणतीही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने भाववाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली आहे.
स्मारकाचा विसर
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचा विसर सरकारला पडला आहे, त्याबाबत कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात दिसून आली नाही.
COMMENTS