मुंबई : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यात महाराष्ट्र सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक निर्बंध लादलेले असूनही कोर...
मुंबई :
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यात महाराष्ट्र सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक निर्बंध लादलेले असूनही कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश आलेले नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाउन लागू केला जाऊ शकतो. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड -१९ टास्क फोर्सबरोबर महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. आजच्या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेता येईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. काल (शनिवारी) उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती.
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, महाराष्ट्रात आठवड्याच्या शेवटी शनिवार- रविवार संपूर्ण लॉकडाऊन केला आहे. हेच निर्बंध पुढील काही दिवसांसाठी कायम ठेवले जाऊ शकतात. सध्याचे लॉकडाउन मागील वर्षीसारखे नाही. एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, "आम्ही सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घालणार नाही पण कोणत्याही ठोस कारणाशिवाय लोकांना प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही." त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा उड्डाणे थांबणार नाहीत. रेल्वे आणि बस चालू राहतील जेणेकरून लसीकरण, परीक्षा किंवा इतर कोणत्याही आवश्यक कामांमुळे जे लोक आपली घरे सोडतात त्यांना कोणतीही अडचण येऊ नये. टास्क फोर्समधील तज्ज्ञांच्या मते, राज्यात कोरोना संक्रमणाची साखळी मोडण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा लॉकडाउन आवश्यक आहे.
महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत शनिवार व रविवार लॉकडाऊन जाहीर केले होते. परंतु आता कडक निर्बंध लादले जातील, त्याची अंमलबजावणीही कठोर असेल.
शनिवारी महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची ५५ हजार ४११ रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात राज्यात ३०९ लोकांचा मृत्यू झाला ही चिंतेची बाब आहे. राज्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची एकूण संख्या आता ३३ लाख ४३ हजार ९५१ च्या वर गेली आहे, तर कोरोनामुळे एकूण ५७ हजार ६३८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शनिवारी झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन आवश्यक आहे. ते म्हणाले की रविवारी टास्क फोर्सची बैठक होणार असून त्यामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर सांगितले की, कोविड १९ चे संक्रमण रोखण्यासाठी कडक निर्बंध असूनही रुग्ण संख्या वाढत आहेत, येत्या काही दिवसांत आरोग्य यंत्रणेवर आणखी ताण येऊ शकतो. मुख्यमंत्री उद्या टास्क फोर्सशी बैठक घेतील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
संपादन व लेखन : महादेव गवळी
COMMENTS