प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण सेवा संस्थेचे चेअरमन प्रकाश कांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आणि सध्...
प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण सेवा संस्थेचे चेअरमन प्रकाश कांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आणि सध्या पॅरोलवर सुटलेले गावचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची धारदार शस्राने वार करून हत्या करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील बहुचर्चित असणार्या नारायणगव्हाणच्या माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. शेळके हे त्यांच्या शेतात काम करत असताना अचानक काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी शेळके एकटेच असल्याने त्यांना प्रतिकार करता आला नाही. धारदार शस्राने त्यांच्यावर वार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली, त्यांना उपचारासाठी शिरूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
माजी सरपंच शेळके यांच्या हत्येने ‘मागच्या’ प्रकरणाचा सूड उगवला की काय अशी तालुकाभर चर्चेला उधान आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत, त्यांच्या तपासाअंती या हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.
COMMENTS