'शब्दगंध' साहित्यिक परिषद, कोपरगाव शाखा आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद... कोपरगाव : प्रतिनिधी 'कोपरगावच्या मात...
'शब्दगंध' साहित्यिक परिषद, कोपरगाव शाखा आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद...
कोपरगाव : प्रतिनिधी
'कोपरगावच्या मातीचा सुगंध कवितेच्या माध्यमातून जगभर पसरावा, येथील साहित्यिक वारशाचे पुनर्निर्माण व्हावे. आजच्या परिस्थितीमध्ये कविता माणुसपणाची जाणीव करून देत असल्याने ती समृद्ध व्हावी, यासाठी असे साहित्यिक उपक्रम महत्वाचे आहेत', असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद भोसले यांनी केले.शब्दगंध साहित्यिक परिषद कोपरगाव शाखेच्या वतीने आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी हे अध्यक्षस्थानी होते. कोपरगावचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कवी सुभाष सोनवणे, ऐश्वर्याताई सातभाई, प्रा. डॉ. कैलास कांबळे, सुधीर कोयटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.डॉ. सदानंद भोसले म्हणाले की, 'कवितेत भावनेचा ओलावा असावा, कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन व जनजागृतीसाठीचे विचार मांडले जातात. आपली पाळेमुळे कोपरगावच्या मातीत रुजली, वाढली त्यामुळे कोपरगावचे आकर्षण कायम आहे. काव्य संमेलनात सादर केलेल्या कविता प्रासंगिक असून आशावादी आणि प्रेरणादायी आहेत’.
यावेळी मान्यवरांची मनोगतपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कैलास साळगट यांनी तर स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्याध्यक्ष प्रा.डॉ. संजय दवंगे यांनी करून दिला. सदाबहार सूत्रसंचालन मधुमिता निळेकर यांनी केले तर उपाध्यक्ष सुधीर कोयटे यांनी आभार मानले.
काव्य संमेलनात वंदना चिकटे, गणेश पवार, प्रमोद घोरपडे, नारायण गडाख, साक्षी थोरात, योगेश जाधव, सुनील केकान, सुनीता आत्रे, सागर पठारे, मोहिनी लोळगे, नंदकिशोर प्रतिभा खैरे, प्रमोद येवले, कार्तिक झेंडे आदींनी आपल्या स्वरचित रचना सादर केल्या. यावेळी कवयित्री शर्मिला गोसावी, हेमचंद्र भवर, ज्ञानेश्वर शिंदे, राजेंद्र उदागे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,
COMMENTS