अहमदनगर : दिल्ली येथे २६ नोव्हेबरपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास येत्या २६ मार्चला चार महिने पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्य...
अहमदनगर : दिल्ली येथे २६ नोव्हेबरपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास येत्या २६ मार्चला चार महिने पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपाच्या सरकारने आडमुठे धोरणे स्वीकारली आहेत. शेतकरी, कामगार आणि जनसामान्यांच्या विरोधी धोरणामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे. देशातील विविध सामाजिक संघटना आणि शेतकरी संघटनांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु ठेवले आहे. चार महिने उलटले तरी सरकार आंदोलकांच्या मागण्यांवर फेरविचार करायला तयार नाही, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २६ मार्च ला भारत बंदची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती भाकपचे राज्य सहसचिव अॅिड.कॉ. सुभाष लांडे यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त समिती व जन आंदोलनाच्या संघर्ष समिती या भारत बंद मध्ये सहभागी होणार आहेत. भाजप वगळता अनेक पक्ष आणि संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.
भारतीय महिला फेडरेशन अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी हमाल पंचायतचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश घुले, अॅठड.कॉ. सुभाष लांडे, किसान सभेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य अॅाड. बन्सी सातपुते, कॉ. महेबुब सय्यद, आयटकचे अॅ ड. सुधीर टोकेकर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे रामदास वागस्कर, कामगार संघटना महासंघाचे कॉ. भैरवनाथ वाकळे, सरकारी कर्मचारी नेते रावसाहेब निमसे, आर्किटेक्ट अर्शद शेख, युथ फेडरेशनचे शहराध्यक्ष फिरोज शेख, सतिश पवार, भाऊसाहेब थोटे, दिपक शिरसाठ, कार्तिक पासलकर आदी उपस्थित होते.
हुतात्म्यांना अभिवादन!
मंगळवारी (२३ मार्च) शहीद भगत सिंग यांची पुण्यतिथी आहे. या शहीद दिनी शेतकरी आंदोलनात सुमारे २५० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला, ‘त्या’ हुतात्म्यांना अभिवादन करुन मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. तर २८ मार्चला होळी आहे. यादिवशी शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी चार संहिता व विज विधेयक २०२० ची होळी करण्यात येणार असल्याची माहिती अॅमड.कॉ. सुभाष लांडे यांनी दिली आहे.
COMMENTS