पुणे : केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या (farmers producer company) बनवून त्याद्वारे शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखवण्याचे ठ...
पुणे :
केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या (farmers producer company) बनवून त्याद्वारे शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखवण्याचे ठरवले आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या मार्गदर्शनाखी आता भारतात ही एक मुव्हमेंट आकार घेत आहे. त्याद्वारे देशभरात तब्बल 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या बनवल्या जाणार आहेत.
शेतकरी उत्पादक कंपन्या उभारण्यासाठी राज्यात समूह आधारित व्यावसायिक संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची राज्यस्तरीय बैठक नुकतीच कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात घेतली. केंद्र शासनामार्फत देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या करण्याची योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यानिमित्ताने सांगितले आहे.
कृषिमंत्री भुसे यांनी या बैठकीत सांगितलेले मुद्दे असे :
योजना यशस्वी करण्यासाठी पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी.
या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात.
या संस्थांनी कृषी विभागाशी समन्वय ठेवून शेतकऱ्यांना एकत्रित करून प्रत्यक्ष काम करणारी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी.
चांगला प्रकल्प आखण्यात आला असून त्याचा हेतू साध्य होण्यासाठी संस्थांनी मनापासून काम करावे
शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळावा, त्यांची प्रगती व्हावी
शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन कृषी उत्पादनात वाढ व्हावी याला सुसंगत असे काम संस्थांनी करावे
COMMENTS