कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा, राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असे म...
कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा, राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटले आहे. अर्थसंकल्पावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट असल्याने अर्थसंकल्प मांडणे आव्हानात्मक होते. मात्र, तरीही सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्याच्या विकासाला खीळ बसली होती, राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा ठरणार आहे.
COMMENTS