औरंगाबाद : शासकीय कार्यालयांमध्ये कोणतंही काम सहज मार्गी लावणे म्हणजे मोठं जिकीरीचे झाले आहे. कार्यालय कोणतेही असुद्या, त्याला दिरंगाई अटळ...
औरंगाबाद :
शासकीय कार्यालयांमध्ये कोणतंही काम सहज मार्गी लावणे म्हणजे मोठं जिकीरीचे झाले आहे. कार्यालय कोणतेही असुद्या, त्याला दिरंगाई अटळच. मग, या दिरंगाईतून आर्थिक तडजोडीचा मार्ग हाताळला जातो. कर्तव्यात कसूर करून लाचखोरीची अशी अनेक प्रकरणे उघडकीस येतात. मात्र, याला अजूनही आळा बसला नाही. विशेषतः महसुली विभागात मोठ्याप्रमाणावर आर्थिक तडजोडीनंतर सामान्य माणसांची अगदी स्वरुपाची किरकोळ कामे मार्गी लागतात. महसूलच्या ‘या’ लालफितीत अडकलेला कारभारावर विविध स्तरावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या दस्त नोंदणी कार्यालयात मोठी झुंबड उडालेली आहे. याचाच गैर फायदा घेत खरेदी खत करण्यासाठी एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी गंगापूरच्या रजिस्ट्री कार्यालयातील सब रजिस्ट्रार औदुंबर लाटे याच्यासह अन्य एकाविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
घानेगाव शिवारातील दोन रो-हाऊसची रजिस्ट्री करून देण्यासाठी लाटे याने मध्यस्थामार्फत तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराने एसीबीकडे याबाबत माहिती दिली.
पथकाने सापळा रचून खातरजमा केली असता आरोपींनी पंच, साक्षीदारांसमक्ष पैसे घेणार असल्याचे मान्य केले. पुढील प्रत्येक रजिस्ट्रेशनसाठी १३ हजारांची मागणीही केली. त्यामुळे पाेलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक अरुण उगले, अशोक नागरगोजे, भूषण देसाई, राजेंद्र सिनकर, चांगदेव बागूल, देविसिंग ठाकूर यांनी ही कारवाई केली.
COMMENTS