जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी पाहणी करून आढावा घेतला. अहमदनगर : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मनपा आयुक...
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी पाहणी करून आढावा घेतला.
अहमदनगर :
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी सायंकाळी बाजारपेठेची पाहणी करून मार्केट यार्ड येथील मर्चंट बँकेत व्यापाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील वाहतूक व कोरोना नियमाचा आराखडा प्रशासनाला सादर केला आहे.
व्यापाऱ्यांनी शासकीय नियमांचे पालन करण्याचे हमीपत्रही दिले आहेत. या आराखड्याचा विचार करून अटी व शर्तीनुसार बाजारपेठ उघडण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन डॉ. भोसले यांनी दिले.
मनपा आयुक्त गोरे, अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, मर्चंट बँकेचे अध्यक्ष अनिल पोखरणा, संचालक संजय चोपडा, कमलेश भंडारी, नगरसेवक विपूल शेटिया, संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, संजय लोढा, नितीन भंडारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत आहे. तज्ञांच्या मते जुलैत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. बाजारपेठा खुल्या केल्यानंतर शासनाच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे.
व्यापाऱ्यांना मोठा फटका; बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याचा धोका
पुणे-औरंगाबाद-नाशिक येथील बाजारपेठा सुरू झाल्यामुळे नगरमधील ग्राहक दुसऱ्या शहरातील बाजारपेठांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे नगरची बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
COMMENTS