मोदी सरकारने महागाई वाढवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने निदर्शने केली. अहमदनगर : प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल,...
![]() |
मोदी सरकारने महागाई वाढवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने निदर्शने केली. |
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅसचे दर वाढवून संपुर्ण देशात महागाईचा भडका उडविला आहे. 2014 पासून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने महागाई कमी करण्याऐवजी भरमसाठ वाढवून ठेवली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असून, सर्वसामान्य नागरिकांना जगणे देखील अवघड झाले आहे. इंधनावर केंद्र सरकारने विविध कर लादल्याने महागाईचा आगडोंब उसळला आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ शहरातील जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निदर्शने करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे, क्रीडा सेलचे घनश्याम सानप, केडगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष भरत गारुडकर, शहर उपाध्यक्ष अमोल कांडेकर, जॉय लोखंडे, नितीन लिगडे, सुनिता पाचरणे, लता गायकवाड, साधना बोरुडे, उषा सोनटक्के, लंकेश चितळकर, तुकाराम कोतकर, विशाल सकट, गणेश बोरुडे, अन्वर शेख, अतुल लवांडे, संतोष ढाकणे, तुलसीदास बोडखे, जय सानप, मनोज आंबेकर, मतीन ठाकरे, रमेश वराडे आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विधाते म्हणाले की, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले. जनतेची दिशाभूल केली. रेश्मा आठरे म्हणाल्या की, गॅसच्या दरवाढीमुळे घरात महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकट उभे ठाकले असताना केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.
केवळ इंधन दरवाढ मागे घेतली तरी महागाईचा दर आटोक्यात येईल, मात्र केंद्र सरकार जाणीवपूर्वक जनतेची आर्थिक लुट करत असल्याचा आरोप साहेबान जहागीरदार यांनी केला आहे.
COMMENTS