नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर हल्ला करत आहेत. संसदेबाहेर ते ट्विटरपर्यंत अनेक ...
नवी दिल्ली :
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर हल्ला करत आहेत. संसदेबाहेर ते ट्विटरपर्यंत अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत. गुरुवारी राहुल यांनी भारतीय युवा काँग्रेसच्या 'संसद घेराव' कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाचे फोटो शेअर करत राहुलने ट्विट केले की 'हरेगा वो हर बाजी जब निकलगे हम साथ!' 'सरफरोशी की तमन्ना ...' असे ट्विट काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून केले आहे. राहुल यांनी बेरोजगारी, पेगासस सारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले.
https://twitter.com/INCIndia/status/1423194556955201536?s=20
तरुणांच्या सहभागाने मोदींचा सत्तेतून पायउतार होणार
केंद्रातील 'हम दो, हमारे दो की सरकार'मुळे देशातील तरुणांना रोजगार मिळू शकला नाही, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. संसदेच्या दिशेने जाणाऱ्या संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी जंतर - मंतरजवळ रोखले. राहुल गांधी म्हणाले, "या सरकारचा उद्देश तरुणांचा आवाज दडपून टाकणे आहे कारण त्यांना माहित आहे की जर भारतातील तरुण आपले मनातले बोलू लागले, सत्य बोलू लागले तर नरेंद्र मोदी सरकार सत्तेतून पायउतार झाल्याखेरीज राहणार नाही. त्यामुळे तरुणांनी सत्य बोलले पाहिजे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1423199558750720000?s=20
नरेंद्र मोदीजींनी पेगाससची केवळ माझ्या फोनच्या आतच नव्हे तर भारतातील प्रत्येक युवकाच्या फोनमध्ये टाकली आहे. त्यातून तरुणांचा आवाज दडपण्याचा विचार आहे. मात्र, युवक काँग्रेसचे काम तरुणांचा आवाज बुलंद करणे आहे. आम्ही तरुणांचा आवाज दाबू देणार नाही - राहुल गांधी
COMMENTS