नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राज्यांनी केलेल्या लॉकडाऊनचा (lockdown) देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला आहे. भारतीय र...
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राज्यांनी केलेल्या लॉकडाऊनचा (lockdown) देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये तब्बल 3 हजार 512 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
गडकरी म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी टोल प्लाझा बंद झाल्यामुळे 814.13 कोटींचे नुकसान झाले आहे. विभागास कोरोना काळात मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरुन काढण्यासाठी आता काही काळ जाणार आहे. तसेही कोरोनामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे.
देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. 2018 मध्ये मध्यम आणि जड प्रवासी वाहन श्रेणीतील इलेक्ट्रीक वाहनांची संख्या फक्त 124 होती. आता मात्र यामध्ये मोठी वाढ झाली आहे. आजमितीस या श्रेणीतील जवळपास 1356 इलेक्ट्रीक वाहने आहेत. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाअंतर्गत एकही गिरणी गेल्या दोन वर्षांत बंद झालेली नाही. कोरोनाच्या काळात काही गिरण्यांमध्ये काम थांबले होते. गडकरींनी एका वर्षात भारतीय वाहन बाजारात फ्लेक्स-इंधन वाहने आणण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले होते. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांमध्ये कमीतकमी सहा एअरबॅग उपलब्ध करुन देण्याचे आवाहन वाहन कंपन्यांना केले होते.
अमेरिकेत भारतापेक्षा जास्त रस्ते अपघात होतात. मात्र, अमेरिकेत अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी आहे. भारतात मात्र रस्ते अपघातात तुलनेने जास्त मृत्यू होतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कार मध्ये किमान सहा एअरबॅग उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन त्यांनी देशातील वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना केले होते. कंपन्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली हे मात्र समजू शकलेले नाही. मंत्री गडकरी यांनी केलेल्या आवाहनास आता कंपन्या कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
COMMENTS