इसळक (ता. नगर) येथील सुपुत्र सतीश शिवाजी गेरंगे यांनी भारतीय सैन्य दलातील सेवापूर्तीनिमित्त त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्य...
प्रतिनिधी: अहमदनगर
इसळक (ता. नगर) येथील सुपुत्र सतीश शिवाजी गेरंगे यांनी भारतीय सैन्य दलातील सेवापूर्तीनिमित्त त्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष माजी सैनिक विनोदभाऊ परदेशी यांच्या हस्ते प्रहार करिअर अकॅडमी येथे करण्यात आला.
यावेळी श्री. परदेशी बोलतांना म्हणाले की, ‘राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जय जवान जय किसान’ हे ब्रीद घेऊन संघटनेचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी आणि जवान देशाचे मुख्य कणा आहे. संघटना शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढा उभारते. संघर्ष करते. तसेच जवानांचा सन्मान करणे हे संघटनेचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्यभावनेतून इसळक येथील सेवानिवृत्त जवान सतीश गेरंगे यांचा संमांव सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशसेवा करून निवृत्तीनंतर संघटनेत काम करून समाजसेवेचे व्रत अंगीकारावे, असा विनंतीवजा सल्ला त्यांनी गेरंगे यांना दिला.
यावेळी प्रहार संघटनेचे तुकाराम गेरंगे, नितीन पानसरे, अशोक दळवी, उद्योजक पोपट तांबे, माजी सरपंच बाबासाहेब गेरंगे, मनोज गेरंगे आदी उपस्थित होते.
COMMENTS